शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:17 IST

महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप’द्वारे तीन टप्प्यात दुष्काळसदृश तालुक्यांचे सर्वेक्षणदुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार सलग २१ दिवस पाऊस न पडलेल्या २०० तालुक्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, हे तिन्ही टप्प्यांतील सर्वेक्षण २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्टÑात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी असमाधानकारक पाऊस झाला आहे; त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे; पण हे नुकसानग्रस्त भागांची तपासणी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याचे मुंबईत शुक्रवारीच उद्घाटन झाले.

या ‘अ‍ॅप’द्वारे महाराष्टÑात पडलेल्या पावसाचे गाव, मंडल, तालुका व जिल्हानिहाय मोजमाप करण्यात येत आहे. सलग २१ दिवस ज्या तालुक्यात पाऊस पडत नाही, असे तालुके संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत, अशा राज्यातील २०० तालुक्यांत २१ दिवस पाऊस पडला नसल्याने केंद्राच्या निकषांप्रमाणे त्यांचा संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

या दुसऱ्या टप्प्यातील पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्या पाहणीत त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती यांचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय निवडलेल्या तालुक्यांची तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी करून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून दुष्काळजन्य परिस्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर